Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/29/2022
नारायण राणे विरुद्ध ठाकरे सरकार हा एपिसोड गेल्या महिनाभरात जोरदार गाजला. जिथे संधी मिळेल तिथे ठाकरे सरकारनेही राणेंना अडचणीत आणलं, तर राणेंनीही पलटवार करण्याची एकही संधी सोडली नाही. पण अखेर हायकोर्टात गेलेल्या वादात ठाकरे सरकारलाच एक पाऊल मागे घ्यावं लागलंय. मुंबई उच्च न्यायालयात राणेंच्या जुहू येथील आधिश बंगल्यासंबंधित तोडक कारवाईच्या आदेशाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. कारणे दाखवा नोटीस न देता जारी केलेल्या आदेशाला नारायण राणेंच्या कंपनीने आव्हान दिलं होतं. अखेर यावर सुनावणी झाली आणि ठाकरे सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं. नारायण राणे यांच्या जुहू येथील आधिष बंगल्या विरोधात कारवाईचा आदेश मागे घेत असल्याचं स्पष्टीकरण महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांनी कोर्टासमोर दिलंय. कोर्टाच्या या निर्णयामुळे नारायण राणेंना मोठा दिलासा मिळालाय, तर सरकारवर कारवाईचा आदेश मागे घेण्याची नामुष्की ओढावलीय.

Category

🗞
News

Recommended